दिल्ली :
सध्या ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाचा सगळ्यांनी धसका घेतला आहे. सर्व काही सुरळीत चालू झाले असले तरीही अद्याप कोरोनाचा धोका कमी झालेला नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ब्रिटनमधून येणारी सर्व विमाने थांबवण्यात आलेली आहेत. B.1.1.7 असे या विषाणूचे नाव असून तो जास्तच घातक असल्याचे समजत आहेत. आता ब्रिटनमधून राज्यात आणि देशात आलेल्या लोकांवर लक्ष ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ब्रिटनमधून देशात परतलेल्या नागरिकांपैकी 20 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या 20 जणांपैकी 8 जण हे दिल्लीमधील आहेत. ब्रिटनहून भारतात आलेल्या अनेक लोकांचा अद्याप पत्ता नाही. महाराष्ट्रातही पोलिसांनी आवाहन करून सुद्धा अनेक लोक प्रशासनासमोर आलेले नाहीत. हेच लोक जास्त धोकादायक ठरू शकतात. देशभरातून गेल्या महिनाभरात 30 हजार पेक्षा जास्त जण ब्रिटनमधून भारतामध्ये परतले आहेत. या सर्वांची सध्या चाचणी करण्यात येत आहे. यामधील 100 पेक्षा जास्त जणांमध्ये कोव्हिड-19 (Covid-19) ची लक्षणं आढळली आहेत. या सर्वांना सध्या विलिगिकरणात (Isolation) ठेवण्यात आले असून त्यांच्यात प्रकृतीकडे आरोग्य यंत्रणांचं लक्ष आहे.
संपादन : स्वप्नील पवार
- आशिया खंडातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत ‘या’ माजी उपमुख्यमंत्र्यांना धक्का; बारामतीकरांचे बारीक लक्ष भोवणार
- तृतीयपंथी असल्याने अर्ज नाकारलेल्या अंजली पाटलांचा निकाल आला समोर; वाचा, काय आहे निकाल
- अण्णांच्या राळेगणसिद्धीत घडला ‘हा’ प्रकार; ‘त्यांनी’ मारली बाजी
- महाविकास आघाडीतील तीनही पक्ष ‘या’ ग्रामपंचायतीसाठी आपसात भिडले; मात्र घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार
- आमदार मामाला गावातून झटका; माजी आमदार भाचीने केले ‘असे’ परिवर्तन