‘एकाला चलो रे’चा नारा देतानाही सुमारे 15 पक्षांची राजकीय मोट बांधून भाजपने देशातील सत्ता मिळवली आहे. मात्र, आता शेतकरी आंदोलनात या पक्षाने आणखी एक मित्रपक्ष गमावला आहे.
अगोदरच अकाली दल या पक्षाने कृषी सुधारणा विधेयकातील जाचक नियमांमुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याकडे लक्ष वेधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपची साथ सोडली आहे. त्यात महिनाभर हे आंदोलन चालू असूनही सरकारने शेतकऱ्यांची दखल घेतली नाही.
उलट शेतकरी आंदोलनास बदनाम करण्याचा डाव भाजपची आयटी टीम आखत असल्याचे आरोप होत आहेत. आंदोलकांना चीनी, पाकिस्तानी, खलिस्तानी आणि नक्षलवादी ठरवून अपप्रचार केला जात आहे. हेच पाहून आणखी एका पक्षाने भाजपची साथ सोडली आहे.
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी नावाच्या पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. पक्षाचे नेते हनुमान बेनीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. शेतकरी विरोधी कायद्यावर भाजप सरकार ठाम असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देऊन शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
संपादन : सचिन पाटील
- पुछता है भारत, क्या बोलेगी सरकार : मग समजेल अर्णब-सरकार संबंधातला दुवा नेमका कोण?
- जगातील ‘हे’ 3 महाराजे होते भलतेच प्रसिध्द; ‘विचित्र’ गोष्टींसाठी खर्च करायचे पाण्यासारखा पैसा
- म्हणून सुरू झाले भावनांचे ‘तांडव’; UP पोलिसांची टीम मुंबईत दाखल
- कोट्यावधी रुपयांचे मालक असलेले ‘हे’ 5 क्रिकेटर्स आहेत फक्त 10 वी किंवा 12 वी पास; इतर नावे वाचून व्हाल शॉक
- ना भाजप, ना महाविकास आघाडी; ‘या’ मंत्र्यांच्या पॅनलने सगळ्यांनाच चारली धूळ