आपल्या गावातून एखादा मोठा नेता झाला की सगळ्यांना विकासाचे स्वप्न पडते. वास्तवात सरकारकडे पाठपुरावा करून विकासासाठी हाच एकमेव मार्ग असल्याने मग त्यासाठी कार्यवाहीही केली जाते. मात्र, फ़क़्त घोषणाबाजी होते आणि वास्तवात नाहीही विकास होत नाही. असेच चित्र दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या गावाचे आहे.
त्यांचे गाव उत्तरप्रदेश राज्यात आहे. त्या राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी या गावाच्या विकासाचा आरखडा तयार करून भाजप सरकारने 14 कोटी रुपयांचा आराखडा जाहीर केला होता. आता एक वर्ष झाल्यावर त्यातील बहुसंख्य कामे सुरू झालेली नाहीत किंवा जी सुरू झाली होती तीच बंद करण्यात आलेली आहेत.
बटेश्वर (बाह, आग्रा) असे त्यांच्या गावाचे नाव आहे. बाह येथे नवीन जिल्हा स्थापन करावा आणि बटेश्वर गावाचा विकास व्हावा यासाठीची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे आता येथील ग्रामस्थांनी भाजप सरकारच्या अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात तीव्र नाराजी आहे.
25 डिसेंबर ही अटलबिहारी यांची जयंती आहे. यंदा 97 वी जयंती होती. तर, मागील वर्षी या गावाच्या विकासासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली होती. मात्र, नंतर पुढे काहीही झालेले नाही. उलट 25 तारखेला काही कामांचे उद्घाटन होणार होते. तेही राज्य सरकारने स्थगित केले आहे. त्यामुळे या गावासह परिसरातील गावांनी भाजप सरकारच्या विरोधात बंद पुकारला आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
- ब्रेकिंग : आता राज्यात पुन्हा होणार 5000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका; ‘या’ कालावधीत उडणार बार
- मोठी बातमी… राज्यात पुन्हा होणार निवडणुका; ‘यावेळी’ होणार 27 झेडपी, 20 महापालिका, 625 नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणूकांचा धमाका
- जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते खाद्यतेल आहे चांगले; वाचा महत्वाची माहिती
- घरच्याघरी बनवा ‘हे’ तेल आणि वेदनेपासून मिळवा मुक्ती
- व्हॉट्सअॅपवर मोदी सरकारची कठोर कारवाई; वाचा, नेमकं काय केलंय सरकारने