मंडळीहो… जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नाही. सबके पिछे सायन्स या लॉजिक होता है. आता डास तुम्हाला चावत असतील आणि तुमच्या शेजाऱ्याला चावत नसतील किंवा कमी चावत असतील तर असं का होतं? याच्यासह अनेक उत्तरं आणि इतर माहिती तुम्हाला या लेखातून मिळणार आहेत.
१) जर आपले रक्त गोड असेल तर डास आपल्याला जास्त चावतात. बऱ्याचदा आपल्याला असे ऐकायला मिळाले असेल. परंतु खरं कारण हे आहे की, ‘O’ रक्तगटाकडे डास जास्त प्रमाणात आकर्षित होतात. या रक्तगटामध्ये असणारे काही विशेष घटक डासांना आकर्षित करतात.
२) आपल्या त्वचेमध्ये लॅक्टिक ऍसिड आढळते. जर त्याचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर डासांची पर्वणीच झाली म्हणून समजा, म्हणजेच जास्त डास चावतील.
३) शरीराचे तापमानदेखील जास्त डास चावण्यामागचे एक मोठे कारण आहे. व्यायाम करताना शरीराचे तापमान वाढते, म्हणूनच व्यायामानंतर अधिक डास चावतात.
४) आपल्या योग शिक्षकाने आपल्याला दीर्घ श्वास घ्यायला सांगितले असेल. पण ते डासांसाठीच जास्त फायद्याचे असते. कारण जेव्हा आपण दीर्घ श्वास घेतो तेव्हा सोडतो देखील जास्त. शरीरातून कार्बनडायऑक्साईड बाहेर सोडताना त्यात आपल्या शरीराचा गंध मिसळलेला असतो. त्यावरूनच डास कोणत्या शरीराला शिकार करायचे आहेत हे ठरवतात. दीर्घ श्वास डासांना अनुमान लावण्यासाठी उपयुक्त ठरतात.
५) गर्भवती महिलांनाही डास जास्त चावतात. वास्तविक गर्भवती महिलांचे तापमान इतर स्त्रियांपेक्षा जास्त असते म्हणून डास त्यांना जास्त डास चावतात.
६) अमेरिकन डास नियंत्रण असोसिएशनच्या म्हणण्यानुसार जगात ३००० हून अधिक डासांच्या प्रजाती आहेत. त्यातील कित्येक डास तर इतके घातक आहेत की माणसाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते.
७) नर डास चावत नाही ही देखील वस्तुस्थिती आहे. केवळ मादी डास चावतात. आपल्या शरीराच्या रक्तामुळे मादी डासांची अंडी जलद तयार होतात. म्हणजेच डासांची पैदास वाढणे ही आपल्या शरीरातील रक्ताचीच कमाल आहे.
संपादन : संचिता कदम
- ‘या’ बँकेचा ग्राहकांना अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून नाही काढता येणार ‘या’ ATM मधून पैसे
- फायद्याची माहिती : म्हणून महाराष्ट्रालाही गरज आहे भावांतर योजनेची; वाचा योजनेचे वैशिष्ट्ये
- ‘त्या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर: अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत मिळतोय टीव्ही; स्मार्टफोनवरही 40% डिस्काउंट
- मोठी बातमी : पशूसंवर्धन मंत्र्याचे आव्हान; बर्ड फ्लूमुळे कोणी व्यक्ती दगावल्याचे दाखवून द्या आणि…
- म्हणून पंजाबी शेतकरी आहेत श्रीमंत; पहा कशासाठी नेमके त्यांचे आंदोलन चालू आहे ते