दिल्ली :
भारत-चीन तणाव अद्यापही निवळलेला नाही. सीमेवर चीनच्या कुरापती चालूच आहेत. चीनच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी आजवर मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. परंतु केंद्र सरकारच्या बाजूने त्यांची कधीच उत्तरे आलेली नाहीत. भारत-चीन हा मुद्दा घेऊन पुन्हा एकदा राहुल यांनी हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांना घेरले आहे.
त्यांनी म्हटले आहे की,चीनच्या अतिक्रमणावरून मोदींनी देशाची दिशाभूल केली, असे संरक्षणमंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे. आपला देश भारतीय सेनेसोबत कायम होता, आहे आणि राहील.
‘पण मोदीजी, तुम्ही कधी चीनच्या विरोधात उभे राहाल? आपल्या देशाची जमीन चीनकडून परत कधी घेणार?’, असे सवाल राहुल गांधींनी विचारले आहेत. पुढे बोलताना त्यांनी मोदींना ‘चीनचे नाव घेण्यास घाबरू नका’, असा सल्लाही दिलेला आहे.
आजवर राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचे आणि प्रश्नांचे उत्तरे केंद्र सरकारकडून आलेली नाहीत. यावेळी तरी केंद्र सरकार कॉंग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे देणार का? हाही प्रश्नच आहे.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
- ‘या’ बँकेचा ग्राहकांना अलर्ट! 1 फेब्रुवारीपासून नाही काढता येणार ‘या’ ATM मधून पैसे
- फायद्याची माहिती : म्हणून महाराष्ट्रालाही गरज आहे भावांतर योजनेची; वाचा योजनेचे वैशिष्ट्ये
- ‘त्या’ ई-कॉमर्स वेबसाइटची भन्नाट ऑफर: अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत मिळतोय टीव्ही; स्मार्टफोनवरही 40% डिस्काउंट
- मोठी बातमी : पशूसंवर्धन मंत्र्याचे आव्हान; बर्ड फ्लूमुळे कोणी व्यक्ती दगावल्याचे दाखवून द्या आणि…
- म्हणून पंजाबी शेतकरी आहेत श्रीमंत; पहा कशासाठी नेमके त्यांचे आंदोलन चालू आहे ते