मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (7 डिसेंबर) मीरपूरच्या शेर-ए बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाईल. पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने भारताचा 1 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करायचे आहे, तर यजमान संघ मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहलीसाठीही हा सामना खास असणार आहे. वास्तविक, रन मशीन कोहलीला या सामन्यात 2 मोठे विक्रम करण्याची मोठी संधी आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेत विराट कोहलीची बॅट नि:शब्द झाली होती. शाकिब अल हसनने त्याला अवघ्या 9 धावांवर लिटन दासकरवी झेलबाद केले. टीम इंडियासोबतच चाहत्यांनाही दुसऱ्या सामन्यात विराटची बॅट कामी येईल अशी आशा आहे. विराटने आज २१ धावा केल्या तर बांगलादेशमध्ये १००० धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरेल. सध्या श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक फलंदाज कुमार संगकारा या बाबतीत आघाडीवर आहे. संगकाराच्या बांगलादेशच्या भूमीवर 1,045 धावा आहेत, तर कोहलीने आतापर्यंत 75.30 च्या सरासरीने आणि 99.59 च्या स्ट्राइक रेटने 979 धावा केल्या आहेत. एक हजार धावांच्या आकड्यापासून तो फक्त २१ धावा दूर आहे.
सध्या विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 71 शतके आहेत आणि तो या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या बरोबरीने उभा आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध आणखी एक शतक ठोकल्यास तो पाँटिंगच्या पुढे जाईल. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्यांच्या यादीत कोहली सचिन तेंडुलकरनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल आणि पाँटिंग एका स्थानाने मागे जाऊ शकतो.
- हेही वाचा:
- ऋषभ पंत ‘या’ कारणामुळे बांग्लादेशविरुद्धच्या मालिकेतून बाहेर; का घेतला BCCI ने हा निर्णय जाणून घ्या सविस्तर या वृत्ताद्वारे
- भारताने सामना गोलंदाजीने नव्हे तर क्षेत्ररक्षणाने गमावला; ‘या’ खेळाडूनेही ओढले भारतीय संघावर ताशेरे