मुंबई: भारत आणि बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना आज मीरपूरच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जात आहे. कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा अँड कंपनीला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे.
मेहदी हसन मिराज (नाबाद 100) आणि महमुदुल्लाह रियाद (77) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 272 धावांचे लक्ष्य दिले आहे. मिराज आणि महमुदुल्लाह यांनी सातव्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली. बांगलादेशने 50 षटकात 7 विकेट गमावत 271 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने तीन तर उमरान मलिक आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारताला या धावसंख्येचा पाठलाग करत चांगली खेळी करावी लागणार आहे. कारण आजचा सामना भारताला जिंकणे आवश्यक आहे. आजचा सामना भारताने जिंकल्यास बांग्लादेशशी भारत 1-1 अशी बरोबरी करेल.
- हेही वाचा:
- विराट कोहलीने बांग्लादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात मोठी खेळी केल्यास, या माजी दिग्गज खेळाडूच्या विक्रमाला मागे टाकू शकतो, जाणून घ्या सविस्तर
- बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात दोन बदल; जाणून घ्या याविषयी सविस्तर वृत्त