मुंबई: बांग्लादेशचा कर्णधार लिटन दासने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs BAN) नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील हा सामना शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज फ्लॉप ठरले. त्याचवेळी, केएल राहुलने विकेट पडण्याच्या दरम्यान महत्त्वपूर्ण खेळी केली. बांगलादेशकडून शाकिब अल हसनने शानदार गोलंदाजी केली. त्याने भारताच्या पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
बांग्लादेशच्या संघाला अनुभवी फलंदाज महमुदुल्लाहच्या रूपाने पाचवा धक्का बसला आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा महमुदुल्ला 35 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. महमुदुल्लाहच्या धक्क्यातून बांग्लादेशचा संघ सावरलाही नाही की अनुभवी खेळाडू मुशफिकुर रहीमही बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पहिल्या वनडेत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना मुशफिकर रहीमने 45 चेंडूत 18 धावा केल्या. रहिमला मोहम्मद सिराजने बोल्ड केले.
मैदानावर यावेळी हुसैन आणि हसन खेळी करत असून बांग्लादेशला विजयासाठी 72 चेंडूत 4.41 प्रति षटकाच्या सरासरीने 53 धावा हव्या आहेत.
- हेही वाचा:
- रहीम आणि महमुदुल्लाहच्या खेळीने बांग्लादेशचा डाव मजबूत स्थितीत, टीम इंडियाची मात्र वाढली अडचण
- भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारतीय संघ 7 वर्षे जुना हिशोब चुकता करण्यासाठी उतरेल, जाणून घ्या याविषयी सविस्तर वृत्त