मुंबई: भारत आणि न्यूझीलंडचे क्रिकेट संघ नेपियर येथे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भिडत आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीकरत भारतासमोर 161 धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या.
टीम इंडियाची बॅटिंग सुरू झाली आहे. भारताकडून इशान किशन आणि ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात उतरले होते. मात्र चांगली सुरुवात झाली असताना किशन ने मिल्नेच्या गोलंदाजीवर चैपमैनच्या हाती झेल देत तो आउट झाला. त्यांनतर पंत ही काही चांगली खेळी करू शकला नाही. तोही लागलीच स्वस्तात आउट झाला. त्यांनतर आलेला श्रेयस अय्यर ही काही कमाल दाखवू शकला नाही. तोही शून्यावर आउट होऊन मैदानाबाहेर परतला. यावेळी साउदीने 2 बळी घेत आपल्या गोलंदाजीचा नमुना दाखवून दिला.
यावेळी मैदानावर हार्दिक पांड्याआणि सुर्यकुमार खेळी करत असून पांड्या चांगली खेळी करताना दिसत आहे. दोघांकडून चांगल्या खेळीची भारतीय संघाला गरज आहे. भारताच्या पहिल्या 5 षटकात 3 गडी गमावत 50 धावा झाल्या आहेत.
- हेही वाचा:
- सिराज आणि अर्शदीपच्या गोलंदाजीने केली कमाल; न्यूझीलंडने भारतासमोर ठेवले 161 धावांचे लक्ष्य
- Jio वापरकर्त्यांना मोठा धक्का; आता Disney+ Hotstar मोफत बघता येणार नाही, जाणून घ्या यामागचे कारण